ठाणे : महापालिका कार्यक्षेतील विसर्जन घाटांचे काम पूर्ण करुन आवश्यक सेवा-सुविधा देण्यात याव्यात तसेच दरवर्षी निर्माण करण्यात येणारी कृत्रिम तलाव न करता मासुंदा तलावाच्याक धर्तीवर कायम स्वरुपी कृत्रिम तलाव तयार करण्यात यावे, असे आदेश महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी पाहणी दौऱ्या दरम्यान प्रशासनास दिले.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी विविध ठिकाणी श्री गणेश मुर्ती विसर्जन घाट तयार करण्यात येतात. या विसर्जन घाटांवरील पूर्व तयारीची बैठक महापौर यांनी त्या-त्या विभागातील नगरसेवक व संबंधित अधिकारी यांचे समवेत केली. सदर पाहणी दौऱ्यास नगरसेवक पल्लवी कदम, मिलिंद पाटणकर, कृष्णा पाटील, नंदा पाटील, दिपा गावंड, मालती पाटील, नम्रता पमनानी, शर्मिला गायकवाड, विकास रेपाळे, परिषा सरनाईक, नरेंद्र सुरकर, पद्मा भगत, साधना जोशी, सिध्दार्थ ओवळेकर, माजी नगरसेवक गिरीश राजे व नम्रता भोसले तर प्रशासनाचे वतीने सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड, अनुराधा बाबर, प्रदिप मकेश्वर, झुंजार परदेशी, उपनगर अभियंता राजन खांडपेकर, कार्यकारी अभियंता हनमंत एमेलवाड, प्रशांत फाटक, चेतन पटेल, रामकृष्ण कोल्हे, भारत भिवापूरकर, नितीन पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी हळदेकर, प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान, उप अभियंता महेश बहिरम, संजय कदम, प्रशांत शेडगे, ऋषिकेश जवळकर, नादावडेकर, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक शाम कसबे आदी उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्या दरम्यान मासुंदा तलाव, आंबे-घोसाळे तलाव, कोपरी, रायलादेवी तलाव, उपवन तलाव, गायमुख, कोलशेत येथील विसर्जन घाटाची पाहणी करुन सर्व कामे पूर्ण करण्याची यामध्ये कृत्रिम तलाव तयार करणे, विद्युत व्यवस्था, पिण्याचे पाणी, साफसफाई, आवश्यकतेनुसार निर्माल्य कलश पुरविणे, बॅरीकेटींग करणे व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजना करणे, आवश्यकतेनुसार पायऱ्या बांधणेसाठी तसेच माहिती फलक लावणेबाबत सर्व संबंधितांना महापौर यांनी सूचना केल्या. तसेच दरवर्षी आपण कृत्रिम तलावांची निर्मिती करतो तसे न करता अस्तित्वातील तलावांमध्ये मासुंदा तलावाच्या धर्तीवर तलावांमध्येस एका बाजूस कायम स्वरुपी कृत्रिम तलाव करुन, यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने लोखंडी जाळी बसवून निर्माल्य वा अन्य प्रकारे गैरवापर होणार नाही यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही आदेश या वेळी दिले.
महापालिकेच्या माध्यमातून कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असून, गेल्या १० ते १२ वर्षांपासून हा अभिनव प्रकल्प महापालिका राबवित आहे व याचे अनुकरण आज अनेक महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहे. महापालिकेच्या उपक्रमास निश्चितच ठाणेकरांचा प्रतिसाद मिळाला, त्यामुळे तलाव अबाधित राखण्यास मदत होते. यावर्षी देखील कृत्रिम तलाव, स्वीकार केंद्र तयार करण्यात आली असून, नागरिकांनी याचा वापर करावा.
तसेच महापालिका, पोलीस विभाग व वाहतुक नियंत्रण विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौर यांनी या वेळी नागरिकांना केले. तर समस्तक ठाणेकरांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा या निमित्ताने महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी दिल्या.